EV Vehicle Mahiti MH सर्वात आधी सरकार मार्फत खालील सवलती काही सवलती इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार आहेत.
- जे महत्वाची महामार्ग आहेत त्या सर्व महामार्गावर ev वाहनांना टोल सूट देण्यात येणार आहे.
- समृद्धी महामार्गावर टोल सूट मिळणार आहे.
- मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर देखील सूट मिळणार आहे.
- तसेच अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतु
ev वाहनांसाठी ही महत्वाची माहिती आहे.
सन 2021 नंतर देशात सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांची मागणी चांगल्या प्रकारे वाढली आहे. पण पेट्रोल आणि डिझेल वाहनं पेक्षा ev वाहनांची किंमत जास्त आहे. त्यामुळ सर्व सामान्य लोक पेट्रोल नाहीतर डिझेल वाहनांकडे वळतात.
जर पर्यावरणाच्या दृष्टीने पहिलं तर पेट्रोल आणि डिझेल वाहन हे मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहेत त्यामुळ जनतेने इलेक्ट्रिक वाहन जास्त खरेदी करावे असे धोरण सरकारने समोर ठेवले आहे.
आता हा जो नवीन निर्णय सरकारने घेतला आहे,की इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात सवलती मिळणार आहेत. पण जे लोक EV वाहनं घेतात त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागतो जसे की,
- प्रथम पहिल तर ev वाहनांची किंमत जास्त आहे. त्यामुळ पैसे जास्तच मोजावे लागणार आहेत.
- चार्जिंग स्टेशन उपलब्ध नाहीयेत, मोठ मोठ्या शहरं सोडली तर चार्जिंग स्टेशन उपलब्ध करण्याची गरज आहे.
- लांबच्या प्रवासासाठी ev वाहन घेऊन जाणे, अजूनही लोकांना योग्य वाटत नाही.
- वेळ खाऊ प्रवास, जर गाडी ची बॅटरी संपली तर पुन्हा चार्ज होण्यासाठी खूप वेळ लागतो
पण ev वाहनाचा फायदे देखील भरपूर आहेत. जसे की,
- इलेक्ट्रिक वाहन महाग असले तरी काही काही काळानंतर चांगल्या प्रकारे पैश्यांची बचत होते.
- या वाहनांसाठी सरकार कडून मोठ्या प्रमाणात सवलती मिळतात.
- Ev वाहणामुळे पर्यावरणाला हानी पोहचत नाही.
- प्रदूषण कमी होते
- कमी खर्चीक वाहन आहे.
या काही गोष्टीचा फायदा जनतेला ev वाहन घेतल्या मुळे होत असतोय.
वरील माहिती मध्ये ज्या काही सवलती सरकार कडून मिळतात. त्याच संबंधी सरकारचे ev वाहनबाबत काय धोरण आहे. त्या संबंधी थोडक्यात माहिती खालील प्रमाणे,
सरकारचे EV वाहन संदर्भात नवे धोरण,
आधी वरील माहिती पाहिल्याप्रमाणे, सरकार आता ev वाहनाबाबत सवलती देत आहे. कारण देशात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने जनतेने वापरवीत जेणे करून प्रदूषण कमी होईल, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात सरकारने देशातील काही शहरं मध्ये डिझेल वाहनांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. याचा परिणाम असा झाला की शहरामध्ये जे धुराचे प्रमाण अतिशय कमी झाले. असेच जर देशातील सर्वच शहरांमध्ये झाले तर चांगलेच पण तेवढ्या साधन सुविधा सर्व शहरांमध्ये उपलब्ध नसल्याने ज्या शहरात डिझेल वाहन बंदी आहे अश्या शहरात देखील लोक सर्रास डिझेल वाहन वापरतात.